Home / राजकारण / कार्यकर्त्यांच्या गर्दीतून उमटला आवाज—काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनाच विजय..!

कार्यकर्त्यांच्या गर्दीतून उमटला आवाज—काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनाच विजय..!

चिखली  : नगरपरिषद निवडणुकीची महाविकास आघाडीची महत्वपूर्ण व महामंथन ठरलेली बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती, चिखली येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वज्रमुठ दाखवत चिखली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.
आघाडीत समाविष्ट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेतृत्वासह मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने सभेला जनआकर्षक वातावरण लाभले. बैठकीस जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे,शिवसेना नेते नरुभाऊ खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेशभाऊ शेळके, ज्योतीताई खेडेकर, अशोकराव पडघान, गजानन वायाळ, बाळासाहेब पवार, रामभाऊ जाधव, शिवनारायण म्हस्के, कुणाल बोंद्रे, दीपक म्हस्के, रामभाऊ खेडेकर, विश्वासराव खंडागळे, तुळशीराम दादा काळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

चिखलीच्या विकासासाठी आघाडी हीच हमी : प्रा. नरेंद्र खेडेकर..!

शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी सुरुवातीलाच भाजपा आणि महायुतीच्या कारभारावर जोरदार टिका करत जनसमुदायाला आवाहन केले की, शहराचा विकास काशिनाथ आप्पा बोंद्रेच करु शकतात‌. चिखलीसाठी सर्वसमावेशक,जात-धर्मभेदापलीचे नेतृत्व महाविकास आघाडी निर्माण करू शकते, असे त्यांनी सांगितले.

चिखलीकरांची महाविकास आघाडीसोबतच नाळ : नरेश शेळके..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके म्हणाले की, चिखलीला पाणी, रस्ते व आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांसह  शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. भाजपच्या फक्त खोट्या आश्वासनांनी चिखली बदलणार नाही . त्यासाठी इच्छाशक्ती आणि पारदर्शकता लागते. ती आघाडीकडे आहे. लोकांचा विश्वास आणि आशीर्वाद आमचा विजय निश्चित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले

धर्मांध शक्तींना थारा नाही : राहुल भाऊ बोंद्रे…!

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी नेहमीप्रमाणेच आक्रमक भूमिकेतून महायुतीवर जोरदार टीका केली. चिखलीत भीतीमुक्त, द्वेषमुक्त, सर्वसमावेशक शासन उभं करायचं असेल तर महाविकास आघाडीला पर्याय नाही. जातीय आणि धर्मांध राजकारणाच्या विरोधात जनता आता सजग झाली आहे. या निवडणुकीत विजय केवळ राजकीय नव्हे तर विचारांचा असेल.चिखलीतील ही एकजूट आणि जनसंपर्कातून उभा राहणारा जनसमर्थनाचा महापूर  आघाडीला निर्णायक व भक्कम विजयाचा मार्ग दाखवेल, असा ठाम विश्वासही राहुल भाऊंनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार